Wednesday, March 25, 2009

Why good things happen with bad people?

एका पार्टित ऐकलेली गोष्ट.

प्राक्तन

एके काळी एका गावात दोन व्यापारी असतात. एकाच नाव सत्यवादी आणि दुसर्याच असत्यवादी. सत्यवादी नावाप्रमानेच सत्य बोलणारा, दुसर्याच भल चिंतणारा, मदत करणारा ,आशावादी मनुष्य असतो. तर या असत्यवादी आत्मकेंद्रीत, खोट बोलणारा, इतराना टोपी घालणारा निराशावादी मनुष्य असतो.
कशी काय कोण जाणे दोघांची मैत्री होते.
अर्थातच असत्यवादी आपल्या स्वभावाप्रमाने सत्यवादीचा नेहमीच फ़ायदा घेत असतो.
एकदिवस दुसया एका गावात एका साधु बाबांच आगमन होत.त्याना म्हणे जगाच मर्म उलगडलेल असत.
दोघे मित्र साधुबाबांना भेटायला जायच ठरवतात.
प्रवासात वाटेत रात्र होते आणि जंगल लागत. पाऊस सुरु होतो. आणि त्यात दोघांची चुकामुक होते. दोघे विरुद्ध दिशेने वाट फ़ुटेल तसे चालत रहातात.
सत्यवादी ला काट्यानी भरलेली वाट लागते. तुडवत, रक्तबंबाळ होत तो अन्न पाण्याविना चालत रहातो.
इकडे असत्यवादी पण वाट मिळेल तसा चालु लागतो. पण त्याच्या वाटेवर फ़ुलांचा सडा अंथरलेला असतो. ठिकठिकाणी फ़ळानी लगडलेली झाडे त्याला लागतात. जागोजागी असलेल्या अम्रुत तुल्य झर्याचे पाणी पिवुन असत्यवादी अगदी सुखात मार्गक्रमणा करीत रहातो.
अचानक त्या दोघाची भेट एका फ़ाट्याजवळ होते.
भुकेन व्याकुळ झालेल्या सत्यवादीला, असत्यवादी आपला सोन्याच्या मोहरानी भरलेला रांजण दाखवतो आणि आपल्या सुरेल प्रवासाच वर्णन करतो.
"अच्छा दोस्ता , मला आता घरी गेल पाहिजे. साधु बाबांकडे जाण्याची आता मला गरज वाटत नाही." आणि असत्यवादी घराकडे परतायला निघतो.
खिन्न झालेला सत्यवादी एकटाच साधुबाबांकडॆ पोहोचतो.
"मी अस काय केलेल म्हणुन माझ्या वाट्यास हे भोग यावेत. आयुष्यभर चांगला वागलो तरी माझ्या वाट्यास हे फ़ळ. " सत्यवादीची त्याच्या मुल्यांवरची निष्ठा डळमळीत होवु लागली होती.
"चुकतोयस तु . उलट आज तुझ्या पुण्य कर्मांमुळ तुझी एका मोठ्या संकटातुन सुटका झाली आहे." बाबा सत्यवादीला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
हं. आता याच्यापेक्षा कुठल मोठ संकट असणार होत." सत्यवादी थोडा कडवट पणे म्हणतो.
"आज तुझ्या नशिबात 'मॄत्युयोग' होता. पण तुझ्या पुण्य कर्मानी तो योग तु पुढे ढ्कललास." साधुमहाराज स्मितहास्य करीत म्हणाले.
क्षणभर तीथे निरव शांतता पसरली.
सत्यवादीच मन देवाच्या दयेन उचंबळुन येत.घरातली त्याची वाट पहाणारी चिमुकली तोंड आठवतात.
"महाराज , पण तरीही एक प्रश्न उरतोच. असत्यवादीला तो सोन्याचा रांजण का मिळाला?"
"खरतर आज त्याच्या नशिबात राजयोग होतो.सार्या जगाचा सम्राट होणार होता तो. मोजता सुद्धा येणार नाही अशा संपतीचा मालक. पण एका रांजणावर त्यान आज समाधान मानुन घेतल. "साधुबाबा हसत म्हणाले.
"प्राक्तनात असलेल कधीही चुकत नाही."
सत्यवादीन साधुबाबाना नमस्कार केला आणि तो आपली मार्गक्रमणा करण्यास सज्ज झाला.