Monday, March 06, 2006

सुर

सुर किती भरुन टाकतात नाही आपल्या आयुष्याला?. एखाद गाणं ,एखादी ओळ किती ही वेळा ऐकली तरी समाधानच होत नाही.परत परत ती गुणगुणाविशी वाटते. अगदी मनात साठुन,आपल मन काठोकाठ भरुन जाइपर्यंत. समुद्राच्या गाजेचा,नदीच्या खळखळ आवाजाचा,एकसारखा छतावर थेंब थेंब वाजणाऱ्या पावसाचा, पानगळ सुरु झाल्यावर वाऱ्याच्या झझांवातात पानाच्या भिरभिरीचा, सुर ऐकताना वाटत आपण त्यातच एकरुप होवुन जाव.कि आपणच त्यांचा एक भाग होवुन जाव.
सुरांमध्ये केवढी ताकत आहे नाही?अद्रुश्य राहुनही ते माझी सतत माझी सोबत करीत रहातात. माझ्या भोवती फ़ेर धरुन आपल्या अस्तित्वाची जाणिव करुन देतात. सारा निळा आसमंत ओला होतो. बकुळीच्या फ़ुलाच्या गंधान मोहरुन जातो.
सुराच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण जणु मला नवा भासतो.रोज वाटेवर भेटणारी माणस, रोजचाच तो रस्ता मला वेगळाच वाटतो. सुराच हे सुरेल गाण मग मला परत परत गुणगुणावस वाटत.गावस वाटत. बोलता बोलता आपल्यालाला स्तब्ध करणारे हे सुरेल सुर आपल्या आयुष्याला किती भारुन टाकतात नाही?

काल पहिल्यांदाच संदिप खरे यांच हे गाण ऐकल आणि पुन्हा पुन्हा ऐकावसच वाटल.
यातल्या हलते या शब्दान तर खरोखरच आतुन काहीतरी हलल्यासारख वाटत.

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते!
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शुन्य शब्दात येते।

कधी दाटु येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा।

कधी ऐकु येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातुन ज्या रो जातो बुडोनी
नभाशीच त्या मागु जातो किनारा।

अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते