Monday, February 27, 2006

गुड ओल्ड डेज

जुन्या दिवसाविषयी बोलायच म्हटल कि हल्ली "ओह!ते जुने सोनेरी दिवस, असे उसासेच ऐकायला मिळतात.मग मी ही त्याच सुरात सुर मिळवुन "अरेरे! गेले ते दिवस"अशी हळहळ व्यक्त करुन सुस्कारे टाकीत असते.सगळ इतक झपाट्यान बदलत चाललय कि माझे लहानपणाचे दिवस आता "जुने दिवसच" म्हणावे लागनार. पण खरच ते जुने दिवस इतके सुंदर होते ?आताच्या सोई,ऐषआराम कुठ होते तेव्हा?मग तरीही "गेले ते चांगले दिवस" अस का म्हणायच?
म्हणजे मला आठवत लहानपणी आमच्याकडे car नव्हती.पप्पाच्या officeच्या गाडीमध्ये आम्हाला अगदी कधीतरीच बसायला मिळायच. मुल शाळेत चालतच जायची. आम्ही मैत्रीणी एकमेकीच्या उखळ्या पाखळ्या काढत,कधी भांडण करीत,कधी हातात हात गुंफ़ुन शाळेत जायचो. मुलगे बरेचवेळा टोळक्या टोळक्यान जात. टोळक्यातला एक मुलगा जो सहसा शिष्ट leader असे तो असा उलटा इतर मुलांकडे बघत त्याना काहीतरी महत्वाच सांगत जात असे.सहसा उलट चालनाऱ्या मुलाकडे त्या दिवशीची एकदम important बातमी असे. आम्हाला काही केल्या तो ती बातमी सांगत नसे.
शाळेजवळच्या दुकानात लाल,नारिंगी,पिवळ्या अशा गोळ्यांच्या बाटल्याची रांग असायची.मीठ लावलेले चिंचेचे गोळे ,कच्ची करवंद ,आवळे ,कैरीच्या तिखट्मीठ लावलेल्या फ़ोडी,कच्चे पेरु असा आम्हाला खर्चाला भाग पाडनारा menu असे.डबा कितीही चांगला असला तरी हे पदार्थ खाल्ल्याशिवाय पोट भरतच नसे.
दप्तराचा रंग सहसा तो खाकीच असायचा.कंपास सहसा camel किंवा सोनिचा असे.दररोज नविन पेन घेतल तरी ते हरवायचच. शाईच पेन बरेचदा गळक असायच.हीरो कंपनीच पेन मात्र मस्त होत अगदी.गुलाबी रंगाच्या सुगंधी खोडरबरमुळ कंपासला मस्त वास येई . शिसपेन्सिलीचा वापर शार्पनर मध्ये घालुन टोके काढुन संपवण्यासाठी जास्त होत असे. पुस्तकाना नविन खाकी कव्हर घालुन, नव्या पुस्तकांचा तो करकरीत वास हुंगायला फ़ारच छान वाटे.पण नंतर त्यातल्या बऱ्याच फोटोना दाढीमिशा काढुन इतिहास बदलण्याच पातक आमच्याकडुन होत असे.मला २९च्या पाढ्याने तर फ़ार दमवल होत.घटक चाचणी ही दर महिन्याला त्रास देण्यासाठीच काढली असावी अशी आमची ठाम समजुत होती.

बाजारात TV आलेला पण घरी अजुन TV आणला नव्हता .radio वर सकाळी बातम्या लागत आणि तेव्हा ७ वाजता आम्हाला उठावच लागे.पण खुन,दरोडे,अतीरेकी हल्ला अशा रंजन करणाऱ्या बातम्या जरा कमीच.अगदीच साध्या गव्हाचे क्विंटल ला भाव वाढले,मुख्यंमत्र्याच आश्व्वासन अशा निरुपद्रवी बातम्या ऐकाव्या लागत. रात्री रेडीओवर नाटक असे.खरतर तेव्हा तो traffic updates आणि music साठी नव्हे तर मनोरंजनाच साधन म्हणुण जास्त वापरला जात असे.
आमच्या छोट्या गावात नगरवाचनालयात भरपुर पुस्तक वाचायला मिळायची.तीथल्या बायका जरा खडुस होत्या.पण comics,चिंगी,खडकावरचा अंकुर,गोट्या तीथल्या एका कोपऱ्यात तासनतास बसुन वाचण्यात मी गढुन जात असे.
चित्रपट बघायला टॉकीजमध्ये आम्ही सहकुंटुब जायचो. तीथले popcorn उर्फ़ लाह्या(हे आईच मत होत) हे मुख्य आकर्षण होत.आम्ही पिक्चरच्या आधीची vicco ची जाहिरात सुद्धा चुकवीत नसु.
थोड कळु लागल्यावर घरी TV आला . TV वर एकच channel लागायच.त्यामुळ दुरदर्शनवर जे काही दाखवतील ते निमुटपणे पहावच लागे. सुट्टीत भाड्यान vcr आणुन त्यावर ही पिक्चर बघितले जात. TV आणल्यावरचे दिवस मात्र अगदीच रंगिबेरंगी,सोनेरी होते.
मग एक दिवस आम्ही नंबर लावुन चकचकित निळ्या रंगाची मारुती ८०० घेतली. तेव्हा कारला आताच्या कार सारख auto-transmission,air conditioner वगैरे काही नव्हत. आम्हाला एवढ्याशा त्या गावात फ़ारस कुठ जायच असायचच नाही.आम्ही मग उगाचच कुठतरी खास car ride म्हणुन जायचो. गाडीच्या काचा खाली करुन ,भन्नाट वारा खात कुठतरी फ़िरुन यायचो. घरात एकच सायकल बरेच दिवस होती. तीच मी आणि बहिण वाटुन वापरायचो. नंतर जुनिअर college मध्ये लुना आणल्यावर बरेच दिवस मी ,आईला कधीही सामान पाहिजे असल कि paddle मारुन तयारच असे.पण बरेचदा लुना चढावर चढतच नसे. college मधली मुल फ़िदिफ़िदी हसत आणि मगच मदत करत.
video gamesवगैरे आम्हाला बरेच दिवस माहितच नव्हतं.घरात पत्ते,सापशिडी,caram असे बैठे खेळ खेळत असु.बाहेर मैदानात लपाछपी ,लगोरी ,आबाधबी ,जिबल्या असे खेळ असत.सारख "TimePlease" केल कि बाद व्हाव लागे.
AC तर फ़क्त हॉटेल मध्ये नाहीतर dr च्या रुम मध्ये असतो अस आम्हाला वाटायच. मे मधला उन्हाळा हैरान करुन टाकी.पण माठातल्या थंडगार वाळा घातलेल्या पाण्यान सारी तहान भागे. कधी कधी गाड्यावर बर्फ़ाचा गोळा दुपारी खायला मिळे.ice cream च मशिन चुलत भावंड सुट्टीत आले कि आणल जाई. कडेला बर्फ़ाचा चुरा आणि मिठ ठासुन भरुन , मधल्या डब्यात ice cream च सगळ साहित्य घालुन आळिपाळिने एकजण त्या यंत्राचा दांडा फ़िरवीत बसे. हात दुखुन येत.पण त्या icecream ची चव वर्षभर जीभेवर रेंगाळत राही. नंतर फ़्रिज आल्यावर आई बरेचदा ice cream घरीच करीत असे.त्यामुळ ac त काय 'सुख' असत त्याचा विचार ही कधी मनातच आला नाही.
थोडे दिवसानी हळु हळु आमच्या लहानशा शहरात ही ac दुकान.चित्रपट ग्रुह सुरु होवु लागली.आम्हाला तिथल्या फ़्रिज सारख्या हवेच फ़ार अप्रुप वाटे. गावात पहिली चार मजली इमारत झाली .तिथ गावातली पहिली Lift बसवली गेली.त्या Lift ला एक मिशिवाला liftman होता. तो आम्हा लहान मुलाना Lift च्या बटनाना हात लावु देत नसे.आम्हाला जरा रागच येई मग त्याचा.
गंम्मत म्हणजे घरातल कोण कुठे आहे हे आईला घरातुनच cell phone शिवायही बरोबर कळे. w/e ला सगळे मिळुन तलावावर नाहीतर बागेत फ़िरायला जात असु. कधीकधी लहान plastic ball,कागदी चक्र,पतंग वगैरेची खरेदीही होई. हे बरचस आईच्या mood वर अवलंबुन असे. म्हणजे 'शहाण्यासारख' वागल तरच. माझे chances त्यामुळ बरेचवेळा हुकत.
परवा घरी गेल्यावर microwave नसल्यामुळ आईची गैरसोय होते अस वाटल.त्यात भाज्या,खिचडी,लाडु सगळं करता येत अस तीला सांगितल्यावर;तीन चक्क ignore केल आणि gasवर भाकरी उलटली. तीच काहीच अडत नव्हत microwaveशिवाय. आपल्याला मात्र AC,लिफ़्ट,कार,cell phone यापैकी काहीही बंद पडल तर, जगबुडीच होईल असच आज काल वाटत. 'अस का?' या प्रश्नाला ,"सवय झाली "हे उत्तरही तयार असत.
खरतर जीवन अगदीच साधं आणि सरळ होत त्यावेळी.आताच्या लहान मुलाना मात्र वाटेल cabel TV,iPOD शिवाय जगु तरी कशी शकत होती माणस?अलिकडे मलाही अवघडच प्रश्न वाटतो हा. खरच त्या जुन्या,सुंदर,निरागस दिवसात ह्या वस्तु शिवाय कसे जगु शकलो आपण?काहीच नसतानाही इतके आनंदी कसे काय होतो आपण?

2 comments:

P said...

माझ्याकडुन चुकुन हे post delete झालेल,म्हणुण परत post केलय.:(

Anonymous said...

छान .. एक गज़ल आठवली..ये दौलत भी ले लो.., खरच, कुठे मिलणार आता ती-कागज़ की कश्ती.. वो बारिश का पानी